मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म गुजरातमधील पोरबंदर इथं 1869 मध्ये झाला. वयाच्या केवळ तेराव्या वर्षी कस्तुबाबरोबर विवाह झाला. पुढे सहा वर्षांनी इंग्लडमध्ये वकिली शिक्षणासाठी प्रयाण केले. शिक्षण पूर्ण झाल्यावर मुंबई आणि राजकोटमध्ये वकिली सुरू केली. पुन्हा एका खटल्यासाठी दक्षिण अफ्रिकेत गेले. तिथे साधारण 20-21 वर्ष राहिले. हिंदी बांधवांच्या सेवेसाठी झटले. तिथून परत आल्यावर चंपारण्यात सत्याग्रह केला. पुढे 1920 पासून शेवटपर्यंत भारतीय स्वातंत्रलढ्याचे नेतृत्व केले. त्यांच्यावर गोपाळकृष्ण गोखले यांचा प्रभाव होता. त्यांच्या पत्नीचे नाव कस्तुरबा होते. चार मुले होती. त्यांची नावे हरीलाल, मणिलाल, रामदास आणि देवदास अशी होती. नोबेल पारितोषिकाने सन्मानीत झालेले कवी रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना महात्मा ही उपाधी दिली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्यांना राष्ट्रपिता म्हणून संबोधले. दिल्लीत बिर्ला भवनच्या बागेत फिरताना 30 जानेवारी 1948 ला गोळी मारुन त्यांची हत्या करण्यात आली. नथुराम गोडसे नावाच्या जहालमतवादी हिंदू महासभेशी संबंधित असणाऱ्या माथेफिरूने हे कृत्य केला. केवळ देश नव्हे सगळे जग त्यावेळी हळहळले. |
महात्मा गांधी यांची यांची शनिवारी पुण्यतिथी. त्यानिमित्त महात्माजींच्या विविध पैलूंचे केलेले स्मरण........
शुक्रवार, २९ जानेवारी, २०१६
मोहनदास ते महात्मा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा